अनोखा उपक्रम
इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी घडवून आणली परिक्षेपे चर्चा चाय के साथ
कुऱ्हे पानाचे
येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी पहिल्यांदाच अनोखा उपक्रम राबवत सर्वांना आचर्यचकित केले. आपण नेहमी एखाद्या शाळेने, संस्थाने,मंडळाने, समितीने किव्वा शिक्षकाने उपक्रम राबवला असे पाहतो. पण ' परीक्षेपे चर्चा चाय के साथ' हा नवीन उपक्रम राबवत विद्यार्थीनींनी आपल्या मनातील परीक्षे विषयी भीती, मत व्यक्त केले.
सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा चालू आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळेचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन २५ मार्च पासून परीक्षा सुरू होणार आहेत. अशा काळात या उपक्रमाबद्दल त्यांच्या मनात कल्पना आली. विद्यार्थीनींनी घरून चहा करून आणली. कागदी कप आणले व वर्गातील सर्वांना चहा वाटप करून आपल्या मनातील परीक्षे विषयी भीती शिक्षक ई एस बाविस्कर, ए बी बडगुजर, पंकज बडगुजर व योगेश गांधेले या शिक्षकांसमोर मांडली.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका विचारात परीक्षा नकोच, वर्षातून एकदाच परीक्षा घेण्यात यावी, शिक्षकांनी शिकवलेले आम्हाला समजते पण परीक्षेच्या वेळी पेपर मध्ये आम्हाला मांडता येत नाही, पेपर च्या वेळी मनात भीती असते, केलेला अभ्यास पेपरच्या वेळी अचानक विसरून जातात, वर्षभर शाळा नको, दररोज पिटीचा तास हवा, लिखाण काम जास्त नको. अश्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार व्यक्त केले.
शिक्षक योगेश गांधेले यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे ते समजावून सांगितले. तसेच तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, खेळता खेळता कसे शिकता येईल, पेपर कसा लिहायचा, मांडणी कशी करायची, नियमित अभ्यास करणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे असे सांगितले.
प्रीती सपकाळे हिने घरून चहा बनवून आणला होता. प्रणाली महाजन, पायल सपकाळे, कीर्ती महाजन, दिव्या अहिरे, सोनाली पाटील, आरती पाटील, वैष्णवी बोरसे, योगिता बानाईत, योगिता बरकले, सलोनी जावरे या मुलींनी केले होते आयोजन.
संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर, शाळेचे मुख्याध्यापक डी डी पाटील, पर्यवेक्षक आर व्ही गवळी, वर्ग शिक्षक एच एन बडगुजर. यांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.