Tuesday, 24 November 2020

उपक्रम:कथा क्रमांक:७९

 

दोघे वाटसरू आणि अस्वल - 


दोन गृहस्थ जाण्यास निघाले, तेव्हा त्यांनी आपसांत असा ठराव केला की, प्रवासात जर एखादयावर काही संकट आले, तर दुसऱ्याने त्यास मदत करावी. पुढे ते एका अरण्यांतून जात असता, एक अस्वल त्यांच्या अंगावर धावून आला.
    त्यावेळी त्यापैकी एकजण चपळ होता, तो झटकन एका झाडावर चढून बसला. जड अंगाचा होता, त्याच्याने पळवेना; तेव्हा तो आपला श्र्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन भुईवर पडला. अस्वलाने त्याजजवळ येऊन त्याच्या कानाशी हुंगून पाहिले आणि हे प्रेत आहे असे समजून, त्यास काही उपद्रव न करता, तो निघून गेला.
    अस्वल गेल्यावर झाडावरील गृहस्थ खाली उतरून आपल्या सोबत्यात हसत विचारतो, ‘मित्रा, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ?’ त्याच्या सोबत्याने उत्तर केले, ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लुच्चाच्या शब्दावर पुनः विश्वास ठेवू नकोस.’

तात्पर्य:- सर्व काही ठीक चालले आहे, अशा वेळी पुष्कळ लोक ममता दाखवितात आणि भरंवशाची भाषणे करतात, परंतु संकट प्राप्त झाले म्हणजे जो तो स्वतःचा बचाव करतो. दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा विरळा.

No comments:

Post a Comment