Friday, 18 December 2020

*मिस कॉल द्या📲... गोष्ट ऐका 👂उपक्रम...*

 आतापर्यंत आपण १०० गोष्टी वाचन केल्या आहेत. आता यापुढे 

*मिस कॉल द्या📲... गोष्ट ऐका 👂उपक्रमात सहभागी व्हावे. 


08068264443


या नंबरवर कोणत्याही मोबाईल वरुन मिस कॉल द्या. 


व 


नवनवीन गोष्टींचा आनंद घ्या. 


*😊केव्हाही... कोठेही🤷‍♂️*

(योगेश गांधेले)

Tuesday, 15 December 2020

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢

 *स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢


प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक नाशिक विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  


*विभागाचे नाव - नाशिक* 

विभागातील जिल्हे : *अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार*   


स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇 

https://wa.me/918595524517?text=Namaskar 


कोणासाठी - *१ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी*

माध्यम - *मराठी / सेमी - इंग्रजी*

विषय - मराठी आणि गणित 

कधी - *दर शनिवारी.* विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.  


✍️ विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या. 🙏


*स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा.* 👇

https://youtu.be/y6JdEX6c4AU


*महत्वाची गोष्ट* - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.

उपक्रम: कथा क्रमांक:१००

 अनुभवाच्‍या जोरावर यश - 

अनुभवाच्‍या जोरावर यश - 

download
एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.

तात्‍पर्य : अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो.

Monday, 14 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९९

 अन राजाचे डोळे उघडले-

images%2B%252823%2529


 रामगडचा राजा अतिशय सणकी होता. एके रात्री त्याच्या डोक्यात अशी सनक शिरली. त्याने आपल्या दरबारातील मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले कि,
" आम्ही हे जाणून घेवू इच्छितो कि राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे कि नाही?" राजा आणि मंत्री रात्रभर आणि पूर्ण दिवस नगरात फिरत होते. 
शहराबाहेर त्यांना एक झोपडी दिसली, राजाने त्याच्याजवळील १०० सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघेजण राजवाड्याच्या दिशेने निघाले.
 राजाने वाटेल त्याची कल्पना मंत्र्याला सांगितली,"या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो सुवर्णमुद्रा परत करण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेंव्हा आम्ही त्याला बक्षीस देवू आणि त्याने त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू.
" ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला झोपडीकडे येताना पहिले होते. राजा सणकी आहे हे त्याला माहित होते.
 त्याने राजाला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राजाला त्याने सांगितले.
 राजाने खुश होवून त्याला २०० सुवर्णमुद्रा भेट दिल्या. नंतर हाच क्रम चालू राहिला. दर पाचव्या दिवशी कुणीतरी सुवर्णमुद्रा घेवून दरबारात येत असे व राजा त्याला दुप्पट मुद्रा देत असे.
मंत्र्याने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत चालली होती. 
प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे मंत्र्याला समजत होते पण त्याचा नाईलाज होता.हे सगळे सहन न झाल्याने त्याने अखेर एक दिवस धाडस करून मंत्री राजाला घेवून श्यामच्या घरी गेला तर पाहतो काय?
 श्याम आणि भेटी मिळवणारा प्रत्येकजण तेथे हजर होता. झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता. सर्वजण ऐषारामात राहत होते. सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला. त्याचे डोळे उघडले, त्याने श्यामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोशात जमा करण्याचे आदेश दिले.

तात्पर्य-मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे कि नाही याचाही विचार व्हायला हवा. 

Sunday, 13 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९८

 आई ती आई-

download%2B%252817%2529


मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्‍या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींनाही या दोघींतली खरी आई कोण ?' हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, 'ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.'
न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, 'महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं.
महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला ?' त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, 'हे बालक या बाईचंच आहे. 'त्याला कापण्यात यावं, 'असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.'

अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

Saturday, 12 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९७

 बैल आणि चिलट-

download%2B%252811%2529



बैल आणि चिलट

 एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, 
मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला,
 मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!

तात्पर्य : काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।

Friday, 11 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९६

 मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी ! -

download%2B%25281%2529


मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !

एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली.
देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला !
मित्रांनो, भिकारी कोठे चुकला, ते ओळखा. तुम्हालाही सदोदित आनंदीरहायचे असेल, तर ‘समाधानी वृत्ती’ ठेवा.

Thursday, 10 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९५

 कृष्णाचे सवंगडी - 



20200325_002815



कृष्णाचे सवंगडी - 

"कृष्ण व त्याचा भाऊ बलराम हे दोघं सहा-सात वर्षांचे झाले. तेव्हा त्यांना चांगले वस्त्रं नेसवून, त्यांच्या डोक्यावर मोरपिसांचा मुकुट घालून आणि हातात काठी व पावा देऊन गाई आणि वासरं चारावयास वनात पाठवलं जात.
ते दोघं भाऊ दररोज सकाळी न्याहारी करून रानात गुरं राखायला जाऊ लागले.
त्यांच्याबरोबर इतरही आणखी बरीच गवळयांची मुलं जात असत.
तेथे गेल्यावर रानामध्ये ही मुलं अनेक वेगवेगळया प्रकारचे खेळ खेळून सगळा दिवस मजेत घालवत असत.
कृष्ण हा त्यांचा सर्वांचाच खूप आवडता होता. त्यामुळे सगळया गोपाळांना आपण त्याच्याजवळ नेहमी असावं असे वाटत असे.
कधी सवंगडयांबरोबर खूप धावावं. तर कधी पक्षांचे आवाज काढावे. कधी झाडांवरची फळं काढावी, एकमेकांना वाकुल्या दाखवाव्या असं रोज चालायचं.
कृष्ण दुपारच्या वेळेस यमुनेच्या काठी असलेल्या एखाद्या वृक्षाखाली उभा राहून त्याचा पावा वाजवत असे.
तो आवाज ऐकून त्याचे सर्व सवंगडी व गाईवासरं त्याच्याभोवती जमत असे.
गाईवासरं पाणी पिऊन रवंथ करू लागली की, कृष्ण व त्याचे सवंगडी एकत्र बसून मजेत जेवण करत. कृष्णाच्या हातून खाल्लेला घास सगळयांनाच आवडत असे.
कृष्णांच्या या सवंगडयांध्ये त्याचा सर्वात आवडता सवंगडी होता पेंद्या.
तसेच पेंद्याचे देखील कृष्णावर फार प्रेम होते. जर त्याला कृष्ण कुठे दिसला नाही तर तो कावराबावरा होत असे.
संध्याकाळ झाली की सर्वजण परत आपल्या घरी जात असे. आणि पुन्हा केव्हा एकदा सकाळ होते व आपण कृष्णाबरोबर वनात जातो अस त्यांना होत असे.

Wednesday, 9 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९४

 कालियाचा पराभव - 


20200325_003039

कालियाचा पराभव - 


"कृष्ण व बलराम थोडे मोठे झाले होते. ते दररोज गाईवासरांना घेऊन सवंगडयांबरोबर रानात जात. तेथे गेल्यावर कुस्त्या खेळाव्या, गळयात फुलांचे हार व डोक्यावर मोरपिसांचे मुकुट घालून मुरलीच्या नादात नाचावे व मौज करावी, हा जणू त्यांचा नित्यक्रमच होता. 
गोपांच्या या वस्तीपासून एका कोसाच्या अंतरावर यमुना नदीत एक खोल पाण्याचा डोह होता. या डोहामध्ये एक कालिया नावाचा भयंकर काळा सर्प रहात असे. त्या सर्पाला सात फणा होत्या. त्याच्या विषामुळे त्या डोहातील पाणी अत्यंत विषारी बनलं होतं. कालियाच्या भीतीने त्या डोहाच्या जवळ पशू-पक्षी, किंवा इतर माणसं फिरकत नसे. त्यामुळे त्या भागात भयंकर रान माजल होत.
कृष्णाने ठरविले की, या सर्पाचा आपण नाश करायचा व तेथील पाणी शुध्द करायचं आणि सर्वांची भीती नाहीशी करायची.
एके दिवशी कृष्ण त्याच्या सवंगडयांची नजर चुकवून त्या डोहाजवळ गेला व तेथे असलेल्या एका कदंबाच्या झाडावर चढून त्याने आपले दंड थोपटले, जोरात एक आरोळी ठोकून डोहात उडी घेतली. डोहातील पाणी त्याबरोबर चारी बाजूस उसळलं.
पाणी उसळलेलं बघून कालिया संतापला व पाण्यावर आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो आपल्या सातही फणांतून सगळीकडे विष पसरीत होता.
कालियाने कृष्णाला घट्ट विळखा घातला व त्याला चावण्यासाठी प्रयत्न करू लागला तेव्हा कृष्णाने त्याची मान घट्ट आवळून धरली.
इकडे कृष्ण कुठेही दिसत नाही हे बघून त्याचे सवंगडी तेथे आले. व समोर दिसणारे भयंकर दृश्य पाहून ते घाबरून गेले, आणि अहो, कोणीतरी आमच्या कृष्णाला वाचवा, असे ओरडत ते गोकुळाकडे धावले.
त्यांचे ते ओरडणे ऐकून सगळे गोकुळ यमुनेच्या त्या डोहावर जमा झालं. तो प्रकार पाहून सर्वजण खूप घाबरून गेले होते. यशोदा तर ते बघून जोरात आक्रोश करू लागली.
कृष्णाने मातेचा तो शोक पाहून कालियाचं तोंड अधिकच जोरानं दाबलं. तेव्हा कालिया घाबरला आणि त्याचे कृष्णाभोवती घातलेले विळखे सैल झाले. मग कृष्णाने त्याच्या मस्तकावर चढून नाचायला सुरूवात केली.
अखेरीस कालिया कृष्णाला शरण आला. तो यमुनेच्या डोहातून निघून गेला. कृष्ण नदीच्या काठावर आल्यावर यशोदेने त्याला घट्ट मिठी मारली व प्रेमाने जवळ घेतले.

ते बघून सर्वांनाच खूप आनंद झाला. नंतर सगळेजण गाणी म्हणत उत्साहाने कृष्णासह गोकुळात परत आले.

Tuesday, 8 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९३

 कृष्णाची बैलाशी झुंज - 


20200325_003205


कृष्णाची बैलाशी झुंज - 

सर्वच गोपाळकृष्णांना दूध, दही नि लोणी खूप आवडत असे. ते खाऊन सर्वजण धष्टपुष्ट झाले होते. त्यांच्यात कृष्ण-बलराम हे फार ताकदवान होते. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता. त्यात ते दोघेही अगदी पटाईत होते.
गोपाळांचा दुसरा आवडता खेळ म्हणजे चांदण्या रात्री रासक्रीडा होय. ते कधी बासरी वाजवी तर कधी गोपगोपींसह रास खेळत.
एकदा रात्रीच्या वेळी गोपगोपी कृष्णासह आनंदाने टिपऱ्यांचा खेळ खेळत होते. तेव्हा अचानक एक काळा कुळकुळीत भयंकर असा बैल गोकुळात शिरला.
बैलाचे डोळे एखादया निखाऱ्यासारखे चमकत होते आणि शिंग तलवारीच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण होती. त्याने धडक दिली की मोठेमोठे वृक्षही उन्मळून पडत होते. त्याच्या भीतीनं सगळे गोप गांगरून सैरावैरा पळू लागले.
तेव्हा कृष्णाने पुढे येऊन त्या मस्तवाल बैलाची दोन्ही शिंग दोन्ही हातांनी धरून त्याला जोराने मागे रेटलं. त्याने त्याची मान पिरगळून त्याला खाली पाडलं. नंतर त्याच एक शिंग उपटून त्या शिंगान एक जोराचा फटका त्याच्या तोंडावर मारला. त्याबरोबर तो बैल तडफडून मरून पडला.
कृष्णाने केलेला हा पराक्रम पाहून सगळया गोपगोपींना नवल वाटलं.

कृष्णाला सगळ गोकुळ देवाप्रमाण मानू लागले.

Monday, 7 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९२

 कृष्ण व गोवर्धन - 


20200325_003327


कृष्ण व गोवर्धन - 

"पावसाळा संपला आणि शरदऋतू सुरू झाला होता. दरवर्षीप्रमाणे गोपगोपींनी इंद्राचा उत्सव करण्याची तयारी सुरू केली.
कृष्णाने विचारले, “तुम्ही इंद्राचा हा उत्सव कशासाठी करता?” तेव्हा एक म्हातारा म्हणाला, “कृष्णा, इंद्रदेव हा पाऊस पाडतो. त्यामुळे पिके येतात व भरपूर हिरवं गवत उगवते. ते गवत गुर खातात व त्यावर गुरं पोसतात आणि दूध देतात. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल. अन्नपाण्याशिवाय सर्व लोकांचे हाल होतील. त्यासाठी वेळेवर पाऊस पडावा म्हणून इंद्रदेवांना आपण संतुष्ट केले पाहिजे; आणि त्यासाठी हा उत्सव आहे.”
कुष्णाला हि गोष्ट पटली नाही. तो म्हणाला, “हे बरोबर नाही, कारण आपल सगळं जीवन डोंगर-दऱ्या आणि गुर यावरच अवलंबून आहे. पलीकडचा जो गोवर्धन पर्वत आहे, तो किती चित्रविचित्र रंगाच्या पक्षांनी शोभून दिसत आहे. त्यावरचे मोठे वृक्ष फळांफुलांनी बहरून गेले आहेत. हिरवीगार कुरणं किती सुंदर दिसत आहे. म्हणून आपण सर्वांनी हया गोवर्धन पर्वताचा आणि गाईवासरांचा उत्सव करू या.”
कृष्णाचे हे बोलणे सर्वांना पटले.
त्यांनी सर्वांनी गाईवासरांना वेगवेगळया फुलांनी सजवून त्यांच्यासह सर्वांनी गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली आणि मोठा उत्सव केला.
सगळयांना आनंद झाला. परंतु इंद्राला हे काहीही आवडले नाही. आपला उत्सव या गोपांनी केला नाही म्हणून त्याला राग आला व त्याने जोराचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली.
हे बघून सगळे गोप घाबरले. कृष्णाने सर्वांना धीर दिला. त्याने गोवर्धन पर्वत उचलला व आपल्या करंगळीवर तोलून धरला. सतत सात दिवस पाऊस जोरदार पडला, परंतु गोपांना गोवर्धनच्या छपराखाली असल्यामुळे त्याचा काही त्रास झाला नाही.
इंद्र शेवटी कंटाळला आणि पाऊस थांबला. सगळेजण कृष्णासह परत गोकुळात आले.
तेव्हापासून कृष्णाला सर्वजण गोवर्धन-गिरिधारी असं म्हणू लागले. त्या सगळयांची कृष्णावरची भक्ती अधिकच वाढली.

Sunday, 6 December 2020

उपक्रम:कथा क्रमांक :९१

 कंसाची घाबरगुंडी



20200325_003513

कंसाची घाबरगुंडी - 

कृष्ण-बलरामाच्या पराक्रमाच्या गोष्टी कंसाला कळत होत्या. त्यांचे पराक्रम ऐकून तो मनातून अतिशय घाबरला होता.
तेव्हाच कंसाला कळले की, कृष्ण हा नंदाचा मुलगा नसून वसुदेवाचाच आठवा मुलगा आहे. हे कळल्यावर कंस अधिकच भयभीत झाला, म्हणून त्याने वसुदेवाला पुन्हा कैदेत टाकलं.
काहीही करून कृष्णाचा नाश कसा करावा याचा तो विचार करू लागला.
शेवटी त्याने ठरविले की, कृष्ण व बलराम यांना कुस्त्या पाहण्यासाठी बोलवावं आणि त्यांचा आपल्या पहिलवानांकडून नाश करावा.
कंसाने अक्रुर नावाच्या सरदाराला बोलावले व म्हणाला, “अक्रुरा, तू गोकुळात जा व कृष्णाला व बलरामाला येथे घेऊन ये. ते दोघेही मल्लविद्येत पटाईत आहेत. आपल्याकडेही मोठे मल्ल आहेत. आपण कुस्त्यांचा मोठा उत्सव करू.
अक्रुर हा कृष्णभक्त होता. कंसाच्या आज्ञेप्रमाणे गोकुळात जाण्याच ठरवलं.
कंसाला वाटत होत की, कृष्ण हा आपला शत्रू आहे. त्याला मथुरेत येण्याआधीच संपवावं. तेव्हा अक्रुर गोकुळात जाण्यापूर्वीच कृष्णाचा नाश करण्याचे त्याने ठरविले.
कंसाचा केशी नावाचा एक पराक्रमी भाऊ होता. त्याच्याकडे कृष्णाला मारण्याची कामगिरी त्याने सोपविली.
केशी लगेचच एका मस्तवाल घोडयावर बसून गोकुळात गेला. तेव्हा कृष्ण आपल्या सवंगडयांसह गाईवासरं घेऊन वनात जात होता, केशीने त्यांना वाटेतच गाठलं. कृष्णाचे सवंगडी घाबरून गेले व कृष्णाला म्हणाले, “तू त्या भयंकर घोडयाच्या वाटेला जाऊ नकोस.”
तो घोडा कृष्णावर धावून आला. कृष्णाने त्याच्या तोंडावर असा जोरात फटका मारला की तो घोडा धडपडून खाली पडला. त्याच्यावर स्वार झालेला केशी खूप जोराने खाली आपटला व तत्काळ मरण पावला. घोडयाला एक-दोन फटके मारताच तोही तडफडून मेला.
कृष्णाने केलेला हा पराक्रम पाहून सगळया गोपालांस आनंद झाला. त्यांनी सर्वांनी कृष्णाचा जयजयकार केला.

Saturday, 5 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९०

 कंसाचा वध - 



20200325_003740

कंसाचा वध - 


"मथुरेमध्ये कुस्त्यांचा मोठा उत्सव करण्याचं ठरलं. त्यासाठी मोठा मंडप करण्याच काम अक्रुराकडे दिल होत.
कंसाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोठा मंडप उभारला गेला. त्यामध्ये कुस्त्या पहायला येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची सोय केली होती. मंडपाच्या मध्यभागी कुस्त्यांसाठी एक मोठा हौद तयार केला गेला. त्या हौदाजवळ मथुरेचा राजा कंस याला बसण्यासाठी सुंदर सिंहासन ठेवलं होतं.
सगळी व्यवस्था झाल्यावर एके दिवशी अक्रुर एक सुंदर रथ घेऊन गोकुळात गेला. त्याने नंद व कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना कंसाचा निरोप सांगितला.
कृष्णाला नंद व गोप मंडळी मथुरेस पाठवण्यास तयार नव्हती. मग कृष्णाने सर्वांची समजूत घालून बलरामासह मथुरेस जाण्याचे ठरविले.
यशोदा, नंद व इतर गोपगोपींना कृष्ण जाणार म्हणून दुःख झाल. पण कृष्णाचा निश्चय ठाम होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण व बलराम अक्रुरासह मथुरेस जाण्यास निघाले.
कृष्णाला रस्त्यात देखील मथुरेस जाऊ नये म्हणून गोपगोपींनी विनवणी केली, परंतु कृष्णाने त्यांची समजूत काढली व त्यांना परत गोकुळात जाण्यास सांगितलं.
मथुरेत आल्यावर कृष्ण व बलराम यांच्यासाठी एक मोठा वाडा सजवून तयार ठेवला होता.
कंसाने इकडे आपल्या दरबारातील मुख्य मल्ल चाणूर व मुष्टिक यांना बोलवून सांगितलं की, कृष्ण व बलराम यांना काहीही करून मारून टाका. ते दोघेही लहान मुल आहेत म्हणून बेसावध राहू नका.
कंसाचे एवढयावरही समाधान झाले नाही, तर त्याने आपल्या हत्तीच्या माहुताला बोलावून सांगितलं की, कृष्ण मंडपात येण्यापूर्वी हत्ती दरवाजात उभा ठेव आणि कृष्ण दरवाजात येताच हत्तीला त्याच्या अंगावर सोडून दे.
दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल सुरू झाली. कुस्त्या पाहण्यास मथुरेतील हजारो लोक जमले होते. कृष्ण व बलराम रथात बसून मंडपाजवळ आले तेव्हा ते दोघेही फारच सुंदर दिसत होते. ते दोघे मंडपाजवळ येताच हत्तीने त्यांच्यावर धाव घेतली. कृष्णाने न घाबरता आपले दंड थोपटले व तो हत्तीच्या पोटाखाली शिरला. हत्तीच्या पोटावर त्याने ठोसे मारण्यास सुरूवात केली.
त्यामुळे हत्ती बेजार झाला व कृष्णाला शोधण्यासाठी गुडघे टेकून आपल्या दोन पायांमध्ये त्याने सोंड घातली. त्याबरोबर कृष्ण लगेच बाहेर आला व त्याने हत्तीचे दात खूप जोरानं दाबले. तेव्हा त्याचा एक दात मोडला. कृष्णाने तो मोडलेला दात घेऊन हत्तीच्या कपाळावर जोरदार फटके दिले. त्यामुळे तो हत्ती शेवटी मरण पावला.
ते बघताच कंस मनातून खूपच घाबरला. इकडे हौदामध्ये कुस्त्या सुरू होत्या, परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सर्वांच लक्ष महापराक्रमी कृष्णाकडे होतं. कृष्ण व बलराम मंडपात येताच चाणुर व मुष्टिक हे दोघं मल्ल हौदात उतरले.
त्या दोघांनी आपले दंड थोपटून आपणाबरोबर कुस्ती करण्यास कोणी तयार आहे काय? अस जमलेल्या मल्लांस विचारल, पण कोणीही तयार नव्हते.
तेवढयात बलराम व कृष्ण हौदात उतरले. त्यांची चाणुर व मुष्टिक यांच्याबरोबर कुस्ती सुरू झाली.
त्यांची कुस्ती खूप वेळ चालू होती. त्यानंतर बलरामाने मुष्टिकाच्या छातीवर जोराचा गुद्दा मारला व तो तात्काळ खाली पडला व मरण पावला. तसेच कृष्णाने चाणुरास उचलून फिरवलं व जमीनीवर आपटलं व तो मरण पावला.
कंस मात्र हा सर्व प्रकार बघून खूपच घाबरला, व त्याचे हातपाय थरथर कापायला लागले.
जिथे कंस बसला होता तेथे कृष्ण आला व त्याने कंसाचे केस धरून त्याला सिंहासनावरून खाली ओढलं. कंस आधीच घाबरून गेलेला असल्यामुळे जमीनीवर आदळताच त्याचा मृत्यू झाला.
कंसाच्या मृत्यूमुळे मथुरेच्या प्रजाजनांना फार आनंद झाला. श्रीकृष्णाने मथुरेच राज्य परत उग्रसेनाला दिले.

Friday, 4 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८९

 श्रीकृष्णाचे मथुरेतून प्रयाण - 




20200325_003914

श्रीकृष्णाचे मथुरेतून प्रयाण - 

"बलराम व कृष्ण हया दोघांच्या मुंजी करून त्यांना वसुदेवाने शिक्षणासाठी उज्जयिनीस सांदीपनी नावाच्या एका थोर गुरूंकडे पाठवले.
      गुरूंकडे राहून त्यांनी दोघांनी वेदविद्या व शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यांची गुरूभक्ती, हुशारी व मेहनत पाहून गुरूजी संतुष्ट झाले. तेथे सहा महिने राहून बलराम व कृष्ण हे दोघेही विद्या संपादन करून परत आले. त्यांना पाहून सगळयांना खूप आनंद झाला.
      कृष्णाला मारण्यासाठी कंसाचा सासरा जरासंध मथुरेवर चालून आला. परंतु कृष्णाने त्याचा पराभव केला.
त्यानंतर लवकरच विदर्भाचा राजा महान भीष्मक याची कन्या रूक्मिणी हिजबरोबर कृष्णाचं लग्न झाल. हे जरासंधाला आवडले नाही म्हणून त्याने परत मथुरेवर स्वारी केली. तेव्हा आपल्यामुळे मथुरेतील लोकांना त्रास होऊ नये म्हणून कृष्ण यादवांसह मथुरेतून बाहेर पडला.

त्याने समुद्रकिनारी व्दारका नावाचं एक नवीन नगर वसवल व तो तिथे सुखाने राज्य करू लागला.

Thursday, 3 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८८

 जशी दृष्टी तशी सृष्टी

nature-4431020_960_720


 भगवान श्रीकृष्णाने एकदा एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यांनी युध्दिष्ठराला बोलावून सांगितले, "या यज्ञात आपल्याला एका माणसाचा बळी द्यावयाचा आहे.
त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण त्याचा बळी देवू.
 त्यानंतर त्यांनी दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, "मी एक यज्ञ करू घातला आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे. 
तेव्हा शक्यतो एखादा पवित्र-सज्जन माणूस शोध, आपण त्याचा यथोचित सत्कार करू.' युध्दिष्ठिर एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी निघाला. 
युध्दिष्ठराला एकही दुष्ट माणूस सापडला नाही. त्याला प्रत्येक मनुष्य चांगलाच वाटत होता. तो श्रीकृष्णाकडे परत आला व म्हणाला, "भगवान! आपल्या राज्यात कोणीही दुष्ट नाही आणि आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस हवा आहे तर तुम्ही मलाच बळीच द्या.
 तुमचा यज्ञ तरी पार पडेल. थोड्या वेळाने दुर्योधन आला व कृष्णाला म्हणाला, "देवा! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही.
 तेव्हा देवा, एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा.


तात्पर्य : जशी दृष्टी असेल तसे आपल्याला जग दिसणार आहे.

Wednesday, 2 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८७

 उंदीर, कोंबडा आणि मांजर-

download%2B%25288%2529


 एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, 
"आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच.
 रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे.
 तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, 
की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती.
 तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही.
 नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.

तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.

Tuesday, 1 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८६

 हुशार हत्ती -

download%2B%252810%2529


            एकदा एका गावामध्ये एक हुशार माणूस राहत असतो. ते गाव खूपच लहान असते. गावात थोडीच घरे असतात. तो माणूस सर्वांना चांगली जीवनमूल्ये शिकवीत असतो तसेच चांगले मार्गदर्शन करीत असे. त्यामुळे आता गावातल्या लोकांमध्ये खूप चांगले बदल होतात. कोणाचीच कोणाशी भांडणे होत नाहीत. अशाप्रकारे गाव तंटामुक्त होते.
             गाव तंटामुक्त झाल्यामुळे गावाचा प्रमुख मात्र नाराज होतो. कारण आता गावात कोणाचीच तक्रार नाही. त्यामुळे त्याला पैसे मिळत नाही. त्याअगोदर त्याला या सर्व गोष्टीमुळे पैसे मिळत असत. आपल्याला परत पैसे मिळू लागावेत म्हणून त्या माणसाचा बदला घेण्याचा विचार करून तो राजाकडे जातो. दरबारात सांगतो कि, काही गावकऱ्यांच्या घरात चोरी झाली आहे. राजा लगेचच सैनिकांना चोरांना पकडायला सांगतो आणि जो चोर असेल त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचे आदेश देतो.
          राजाचे सैनिक गावातील सर्व प्रमुख व्यक्तींना आणि त्या सदगृहस्थाला चोर म्हणून पकडून आणतात. जेव्हा त्यांना हत्तीकडे घेऊन जातात. तेव्हा हत्ती त्यांना चिरडत नाही. राजा आश्चर्यचकित होतो.
           मग तो सदगृहस्थ राजाला सांगतो आम्ही काहीही  चूक केलेली नाहीये. आमचे मन पवित्र आहे. आम्ही कोणालाही इजा केलेली नाही. हाच आमचा सदगुण हत्तीने जाणला. त्यांनी आम्हाला शिक्षा केली नाही. त्या शहाण्या माणसाने राजाला खरा प्रकार सांगितल्यावर राजाने गावप्रमुखास शिक्षा केली.   


तात्पर्य - करावे तसे भरावे.

Monday, 30 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८५

 आई ती आई-

download%2B%252817%2529


मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्‍या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींनाही या दोघींतली खरी आई कोण ?' हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, 'ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.'
न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, 'महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं.
महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला ?' त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, 'हे बालक या बाईचंच आहे. 'त्याला कापण्यात यावं, 'असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.'
अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

Saturday, 28 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८४

 मातेचा उपदेश-


 एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे?
 नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.

तात्पर्य : जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्‌गुणांची जोड द्यावी लागते.

उपक्रम: कथा क्रमांक:८३

 सुभेदार आणि त्याचा घोडा- 

images%2B%252824%2529


सुभेदार आणि त्याचा घोडा

एका सुभेदाराचा घोडा फार देखणा आणि चपळ होता; पण त्यापेक्षां दुसरा एक कमी प्रतीचा घोडा त्याने विकत घेतला आणि त्याचे लाड करण्यात आणि त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवण्यातच आपला बहुतेक वेळ घालवू लागला.
       एके दिवशी हा दुसरा घोडा पहिल्या घोडयास म्हणाला, ‘दादा, तू इतका सुंदर, मजबूत आणि चपळ असता, तुजकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात आमच्या धन्यास इतका आनंद वाटतो, याचे कारण काय असावे बरे ?’ पहिला घोडा उत्तर करितो, ‘कोणतीही वस्तू नवी असली, म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व ती अंमळ जुनी झाली की तिजकडे दुर्लक्ष करून नव्या वस्तूच्या नादीं लागावयाचें, हा सर्वसाधारण मनुष्यस्वभाव आहे. हल्ली आपला धनी तुझे फार लाड करतो आहे, पण थोडयाच दिवसांत, मजप्रमाणे तूही त्यास अप्रिय होऊन, तुझ्या जागी नवा घोडा येईल, याबद्दल तुझी खात्री असू दे. ’

तात्पर्य:- ‘वस्तू वाटे नवी जो अवड बहु तिची लोकरीती अशी हे. ’

Friday, 27 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:८२

 लोभी विक्रेता - 

images%2B%25288%2529

लोभी  विक्रेता

   एकदा एक व्यापारी आपल्या वस्तू विकायला गावात येतो. त्या गावात एक लहान मुलगी आपल्या आजीबरोबर राहत असते. तिला कानात घालण्यासाठी कानातले घ्यायचे असते. पण तिच्याकडे पैसेच नसतात. ती आपल्या आजीला सांगते कि आपण आपली जुनी ताट विकून मला कानातले घेऊयात का? आजी तयार होते. आजी तिच्याकडे एक ताट देते.
        ती लहान मुलगी ते ताट घेऊन व्यापाऱ्याकडे जाते. व्य्पारी ते ताट नित निरखून पाहतो. त्याला समजते हे ताट सोन्याचे आहे. पण तो मुलीला ते सांगत नाही. उलट तो तिला म्हणतो  या ताटाला काहीच किंमत मिळणार नाही. मुलगी नाराज होते.
त्या दुकानदाराला तो ताट फुकट घ्यायचे असते म्हणून तो ते परत देऊन टाकतो.
          थोड्या  दिवसांनी दुसरा एक विक्रेता येतो. त्या मुलीला पुन्हा  कानात घालण्यासाठी कानातले घ्यायच्या असतात. तिची आजी पुन्हा तेच ते ताट त्या दुसर्या विक्रेत्याला दाखवते. तो त्या आजीला सांगतो कि, आजी हे ताट सोन्याचे आहे. आजीला आश्चर्य वाटते. तो विक्रेता त्या ताटाच्या मोबदल्यात त्यांना त्याच्याकडील सर्व वस्तू देऊन टाकतो.
        थोड्या दिवसांनी पुन्हा तो हावरट, लोभी दुकानदार येतो. ताटाबद्दल चौकशी करतो. आजी चांगलीच भडकते. खरा प्रकार लक्षात आल्यावर तो पळून जातो.

तात्पर्य - नेहमी खरे बोलावे आणि प्रामाणिक राहावे.